माणूस बोलणे विसरला तर….. मराठी निबंध । Manus Bolne Visarla Tar Nibandh in Marathi

Manus Bolne Visarla Tar Nibandh in Marathi मित्रांनो या संपूर्ण पृथ्वीतलावर माणूसच असा एक महत्त्वाचे आहे जो बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातो. माणसाला देवाकडून मिळालेल्या वेगवेगळ्या पद्धतीने किंमत माणूस पृथ्वीतलावरील सर्वात बुद्धिमान समजला जातो.

ज्याप्रमाणे माणसाला बुद्धी दिली आहे व माणूस बुद्धीचा वापर करून नवनवीन गोष्टींचा अभ्यास करत आहे. त्याप्रमाणेच बोलणे हे देखील एक अशी देणगी आहे ही जी केवळ मनुष्याला दिलेली आहे माणसा व्यतिरिक्त या पृथ्वीवर कोणताही सजीव बोलू शकत नाही.

त्यामुळे बोलणे, विचार व्यक्त करणे भावना व्यक्त करणे हे केवळ मनुष्याला शक्य आहे. बोलण्याच्या याच कलेमुळे माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा समजला जातो. प्राण्यांना देखिये माणसांप्रमाणे सर्व ज्ञानेंद्रिये आहे केवळ एक गोष्ट नाही ते म्हणजे बोलण्याची कला.

माणूस बोलणे विसरला तर मराठी निबंध । Manus Bolne Visarla Tar Nibandh in Marathi

आपल्या भावना गरजा, मत व्यक्त करण्यासाठी माणसाला बोलण्याची क्षमता फारच उपयोगात पडते. बोलण्याच्या कलेमुळे आपण आपले विचार व्यक्त करू शकता आणि समोरच्याचे विचार देखील समजून घेऊ शकतो. परंतु मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का माणूस बोलणे विसरला तर काय होईल?

खरंच मित्रांनो माणूस या क्षमतेचा वापर करायला माणूस विसरला तर मात्र त्याची फार मोठी गोष्ट होईल.

मनुष्य हा समाजा मध्ये एकत्रितपणे राहणारा आहे म्हणजेच समाजशील आणि समाजप्रिय प्राणी आहे. समाजात वावरत असताना मनुष्याला काही नियमांचे पालन करावे लागते. हे नियम जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी होण्याची शक्यता असते म्हणून बोलणे हा माणसाचा स्थायी भाव आहे हा स्वभावधर्म म्हणजेच बोलण्याची कला जर बदलण्याची वेळ आली तर मात्र फार मोठे संकट उभे राहील.

माणूस बोलणे विसरला तर संपूर्ण जगामध्ये पुन्हा आदिमानवा सारखी परिस्थिती निर्माण होईल. तुझ्या प्रमाणेच आणि एकमेकांसाठी बोलण्याकरीता खूणांचा वापर करतात त्याप्रमाणे ती मनुष्याला बोलणे विसरला तर खुणांची भाषा वापरावी लागेल.

आताच्या जगात माणसाने जी प्रगती केलेली आहे. ती सगळी एकमेकांशी साधलेल्या संवादाच्या आधारानेच केलेली आहे. हा संवाद साधण्याची कलाच माणूस जर विसरला तर माणसाच्या विकासाची गती देखील मंदावेल. आता अस्तित्वात असलेल्या सर्वच गोष्टींना मर्यादा येतील.

आज प्रत्येक क्षेत्रामध्ये संवादाची गरज भासते. कोणताही व्यवहार करायचा म्हणता सर्वप्रथम गरज असते ती म्हणजे संवादाची‌ संवादामुळे एखादा व्यवहार चांगल्याप्रकारे पार पाडण्यासाठी संवाद साधणे शक्य झाले नाही तर कोणतेही व्यवहार शक्य होणार नाही.

शिक्षण क्षेत्रामध्ये तर अमुलाग्र बदल करणे भागच आहे. शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील संवाद होऊ शकणार नाही. शब्दांची भाषा माणूस विसरल्यामुळे माणसाला शारीरिक किंवा सांकेतिक भाषेचा वापर करावा लागेल.

ज्या प्रमाणे अंध लोकांना शिकवण्यासाठी ज्या पद्धतीने ब्रेल लिपीचा वापर केला जातो त्या पद्धतीनेच माणूस बोलणे विसरला तर एका विशिष्ट संवाद पद्धतीचा माणसाला अविष्कार करावा लागेल.

त्यामुळे संवादाची नवीन पद्धत शिकण्या मध्ये माणसाचा बराच कालावधी जाईल काही लोकांना तर संवादाचे हे नवीन पद्धत शिकणे अवघड जाईल आणि परिणामी विकास देखील मंदावेल.

जन्मलेले बाळ ज्याप्रमाणे खुणा आणि इशारा करून आपल्या आई-वडिलांना काहीतरी सांगत असते त्याप्रमाणे प्रत्येक माणसाला देखील आपली सुखदुःखे यांच्या माध्यमातून इशारा करून सांगावी लागतील.
एकमेकांची सुखदुःखे सांगण्यासाठी शाब्दिक भाषा नसल्यामुळे माणसाला शारीरिक पद्धतीने स्वतःचे मन व्यक्त करण्यामध्ये फार अडचणी येतील.

जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्ती जवळ काही ना काही छंद किंवा कला असतात. त्याप्रमाणेच एखाद्या महिला कडे केव्हा पुरुषाकडे गायनाची कला असते. तर माणूस बोलणे विसरला तर मनुष्य जवळ असलेल्या गायनाच्या या‌‌कलेचा नाश होईल.

संपूर्ण जगाची माहिती मिळवण्याचे एकमेव साधन म्हणजे टीव्ही, रेडिओ मधील बातम्या या बातम्या देखील आपल्याला ऐकायला मिळणार नाही त्यामुळे जगात कुठे काय चालू आहे हे जाणून घेण्यात आपल्याला अडचणी येतील. त्यामुळे जर माणूस बोलणे विसरला तर माणसाला आनेक समस्यांना तोंड द्यावे लागते तरीदेखील माणूस बोलणे विसरला तर एक गोष्ट मात्र चांगली होईल ती म्हणजे माणसामाणसांमध्ये होणारे कलह मोठ्या प्रमाणामध्ये थांबतील. माणसाला कुणाची निंदा करता येणार नाही. कुणाकडे चुगलीही करता येणार नाही . त्यामुळे भांडणच होणार नाही. भांडणच झाली नाही तर सगळीकडे आनंद होऊन जाईल.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” माणूस बोलणे विसरला तर…… मराठी निबंध । Manus Bolne Visarla Tar Nibandh in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment